Sunday, October 13, 2024

शिवाजी कोण होता?’ - एक विचारप्रवर्तक पुस्तक


शिवाजी कोण होता ? 
या पुस्तकाची पहीली आवृत्ती एप्रिल १९८८ मध्ये ३००० प्रतीची निघाली होती आणि इतक्या उशिरा हे पुस्तक मी वाचलं यांची मनाला खंत वाटतेय.आत्तापर्यंत या पुस्तकाच्या लाखो प्रती विकल्या गेल्या आहेत.२४ भारतीय भाषांत भाषांतर ही झालेलं आहे. या पुस्तकाच्या नावबद्दलही बरीच चर्चा झाली आहे. शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला गेलाय म्हणुन टीका झाली,आक्षेप घेतले गेले,विरोध झाला. परंतू जेव्हा हे पुस्तक पुर्ण वाचुन होत,तेव्हा समजंत हे नाव किती समपर्क आहे. या नावामागची त्यांची भूमिका किती स्पष्ट आहे हे समज़ुन येतं. शिवाजी महाराज हे फक्त काही एका जाती-धर्मा पुरतेच मर्यादित नसून तो कुळवाडी भुषण रयतेचा राजा होता हेच या नावावरुन कॅा.पानसरे यांना सुचवायचे होते.

या पुस्तकाच्या माध्यमातुन समाजप्रबोधनाच्या क्षेत्रात एक मोठी क्रांतीच केली आहे आणि शिवाजी महाराजांच्या कार्याचे खरे स्वरुप लोकांच्या समोर मांडले. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करुन समाजात जातीय तेढ पसरवणाऱ्या शक्तींच्या प्रचाराला आळा बसला आहे. समाजजीवनात प्रवेश करणाऱ्या तरुण पिढीला इतिहासाचे नवे भान देण्याचे हे कार्य आपल्याला करायचे आहे. ही दृष्टी देणारे ‘शिवाजी कोण होता? हे महत्वाचे विचारधन आहे.

शहीद कॅा.गोविंद पानसरे यांनी महाराष्ट्रातीलच नव्हे,तर देशातील सर्व जनतेसमोर खरे शिवाजी महाराज ‘लोक राजे’ यांची वस्तुनिष्ठ मांडणी करुन ऐतहासिक काम केले आहे.त्यांच्या खुनाचे एक कारण हे त्यांचे हे पुस्तक ही असू शकते असेलही.पानसरे यांनी या पुस्तकाच्या रुपाने पुरोगामी महाराष्ट्राला दिलेली ही अविस्मरणीय देणगी आहे.

महाराज राजा म्हणून नेमके कसे होते? सामान्य रयतेला राजा जवळचे का वाटायचे? सामान्य लोक राजासाठी स्वतःचा जीव द्यायला सहजासहजी का तयार होत? इतर राज्यकर्ते व शिवाजी महाराज यांच्यात काय वेगळेपण होतं? शिवाजी राजांच्या काळात व्यापार व उद्योग संरक्षणासाठी काय नियम होते? महाराजांचे हिंदू व इतर धर्माबद्दल काय विचार होते? इतिहासाचा विपर्यास का केला जातो?अश्या आणि इतर अनेक गोष्टी या पुस्तकात सोप्या व सगळ्यांना चटकन् कळेल अश्या भाषेत मांडल्या आहेत. शिवाजी महाराज यांच्या बद्दल थोडक्यात पण मुद्देसूद जाणून घ्यायचे असेल तर हे पुस्तक नक्की वाचायला हवे..!
 जय शिवराय🙏❤️
                                     - ✍️मिथिलेश गायकवाड🌱

Sunday, February 20, 2022

वाट...


आयुष्यात निर्णय चुकले खूपदा 
पण चूकीची वाट धरली नाही... 

स्वप्न साकार करण्यासाठी
जी वाट धरली, 
ती अजून संपलेली नाही..

वाटाच असतील वेगळ्या खूप 
म्हणून तर,
हवी ती वाट अजून भेटली नाही...

वाटेत असला अंधार खूप 
तरी प्रकाशाच्या दिशेकडे धाव 
अजून थांबली नाही...

डोळ्यात पाहिलेल्या स्वप्नांची
वाट सापडेल,
हि आस अजून संपलेली नाही.😌

             
                -✍️मिथिलेश संजय गायकवाड

Monday, May 31, 2021

प्लास्टिक प्रदुषण - एक जागतिक समस्या व त्यावर उपाय

मित्रांनो सध्याची परिस्थिती पाहायला गेल तर देशात कोरोनाने थैमान घातले आहे,कोरोना वाढण्याचे प्रमाण काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये शहर तसेच ग्रामीण भागात हाहाकार घातलाय, लवकरच आपण संकटमुक्त व्हावं हिच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. 
         या संकटातून मुक्त झाल्यावर जरा आपण निसर्गासाठी काहीतरी करू थोडा पर्यावरण अभ्यास करायला हवा,पर्यावरण संशोधकांचामते जर मनुष्याने पर्यावरनाकडे दुर्लक्ष केले तर पुढील काही वर्षानंतर आपल्यावर मोठ संकट येउ शकते ,निसर्गाचा नियमच आहे, जे पेराल तेच उगवेल. आपण निसर्गाला हानी पोहोचवत असु तर परतफेड तर होणारच . पाहायला गेल तर आपल्याकडे विज्ञान साक्षरता कमीच आहे, पाण्याची बाटली पुन्हा वापरू नये असे त्यावर लिहलेले असून सुद्धा आपण त्याकडे लक्ष न देता पुन्हा पुन्हा वापर करतो ,खाद्यपदार्थाची पाकिटे, प्लास्टिकची पिशवी ,पाण्याच्या बोटल्स वापरून झाल्यानंतर जागा मिळेल तिथे फेकल्या जातात. मानवाने न गंजणारी वजनाने हलकी आणि टिकाऊ वस्तू हा पदार्थ बनवला खरा पण तो टाकाऊ झाल्यानंतर नष्ट हि करता येत नाही, त्यामुळे प्रदुषण होते. परत वापरात न आणता येणारे प्लास्टिकचे पदार्थ टाकायचे कुठे त्याची विल्हेवाट लावायची कशी ही समस्या आज जगापुढे आहे. जागतिक पातळीवर पहायला गेले तर दरवर्षाला 330 दशलक्ष टनांपेक्षा अधिक प्लास्टिकची निर्मिती होत आहे. हा वेग लक्षात घेता 30/35 वर्षांपर्यंत प्लास्टिकची निर्मिती तिपटीने होइल म्हणजेच सुमारे एक हजार दशलक्ष टन वाढण्याचा अंदाज संशोधक व्यक्त करत आहेत, आपण भारतात तयार होणाऱ्या प्लास्टिकचा विचार केला तर 1.2 कोटी चा आसपास प्लास्टिक उद्योग भारतात आहेत काही हजार लहान मोठ्या कंपन्या तर सर्वसाधारण पणे एका भारतीयाचा वर्षभरात 11 किलो प्लास्टिकचा वापर होतो. अगदी आपण खात असलेल्या अन्न पदार्थांपासून ते वापरात असलेल्या कपड्यांवरही प्लास्टिकने आपली छाप सोडली आहे. मानवी आरोग्याचा विचार केला तर वेगवेगळ्या माध्यमांद्वारे एका आठवड्यात सुमारे 2 हजार प्लास्टिकचे कण शरीरात जातात.आता हे कण कसले विचार आला असेलच, आपण बिस्किट फोडून,दूध पिशवी कट केल्यावर किंवा काही लोक सिगरेट ओढतात त्याचे तुकडे किंवा अजून वेफर्स वगैरे त्यातला एक छोटा भाग आपण कुठेही फेकतो असेच काही लहान लहान तुकडे नकळत पोटात जातात, एवढ्या मोठ्या प्रमाणात प्लास्टिक शरीरात जात असेल, तर शरीर त्यास कसे प्रत्युत्तर देईल याची कल्पना न केलेलीच बरी. 
           भारतात दररोज लाखो  पाण्याचा बाटल्या पाणी पिऊन फेकल्या जातात, भरपूर प्रमाणात छोटी पाकिटे जागा मिळेल तिथे फेकतात त्याच काय होत असेल, तर ते आहे त्या अवस्थेत पडून राहतात बर हे झाले आपल्या देशातील आता देशात प्लास्टिक तयार होतय ते आहेच पण बाहेरच्या देशांमधून प्लास्टिक येत ते वेगळ, प्लास्टिक स्वस्त आहे त्यामुळे लोक जास्त वापर करतात, म्हणजे भारतात प्लास्टिक तयार होत ते इथुन जास्त बाहेर पण नाही जात याउलट बाहेरच्या देशांमधून प्लास्टिक आयात होतय ते वेगळच, खुप भयानक आहे ना हे. मानवाने प्लास्टिकचा वापर खरच कमी करायला हवा ना.  
           हिच वेळ आहे आपल्याकडे तर मग आपण स्वतः पासूनच सुरुवात करायला हवी, जसे कोरोना काळात आपण घरीच मास्क शिवले आणि वापरले तसेच आपण कापडी पिशवी शिवली आणि तीच वापरली तर प्लास्टिक पिशवीची गरज लागणार नाही, आपण बाहेर काही चॉकलेट, बिस्किटे खातो त्याचे पाकिटे जर आपण इथे तिथे न फेकता घरी येऊन कचर्‍याचा डब्यात टाकले तरी चालेल ते नकळत पुढे प्राणी पक्षांच्या पोटात जाण्यापासून थांबेल, आपण बिस्लरीची बाटली वापरून झाल्यानंतर ती कापून त्यात छोट झाड लावू शकतो किंवा फिरायला गेल्यावर एखाद्या झाडावर लावली तर उन्हाळ्यात पक्षांना पिण्यासाठी पाणी ठेवू शकतो, पुढे हे प्लास्टिक ओढ्याद्वारे, गटराद्वारे नदीमधे जाण्यापासून थांबेल.
       आपण स्वतःच्या शहरातून एक फेरफटका मारला तर जागोजागी प्लास्टिक पिशव्या,छोटी पाकिटे, वापरून टाकलेले पेन, गुटख्याची पाकीट यांचा ढीग दिसतो जर आपण आपल्या मित्रमैत्रिणी सोबत हे सगळ दर महिन्याला गोळा करून पुनर्वापरसाठी कंपनी मधे पाठवण्यास मदत केली आणि लोकांना अशी घाण करण्यापासून थांबवण्यासाठी प्रयत्न केला तर नक्कीच आपण आपल शहर स्वछ करु शकतो प्लास्टिकचा घाणीपासून मुक्त होण्यास  स्वतः आणि स्वतः चा शहरापासून सुरुवात करु शकतो.हिच सुरुवात एक दिवस जगात नक्कीच बदल घडवून आणू शकतो,चला तर मग आपण आपल्यापासून सुरुवात करू.
                                
                                 -✍️मिथिलेश संजय गायकवाड.

Wednesday, May 5, 2021

प्रत्येक घरात एकच आवाज कोरोना विरुद्ध लढायचं आज..

प्रत्येक घरात एकच आवाज 
कोरोना विरुद्ध लढायचं आज,
कोरोना संपायला हवा आज.

कोरोनाचा इथ काय टिकाव लागणार 
जिथ डॉक्टर, पोलिस आणि कर्मचारी आहेत
आपल्या रक्षणासाठी  तैनात, 
कोरोना संपवण्यासाठी रात्रंदिवस 
प्रयत्न करत आहेत अफाट. .

लक्षात राहणार आहेत ते लोकं,
जे देशावर संकट आल्यावर आलेत धावून.
स्वतःचा जिवाची परवा न करता,
देश वाचवण्यासाठी लढत आहेत मैदानात येऊन .

सगळ्यांना समजले आहेत खरे हीरो 
त्याच्या पुढे टीवी चित्रपट आहेत ज़ीरो,
हे कोणी सोशल मीडियावर नाहीत हवा करणारे 
हे कोणी खूप पैसे कमवून नाहीत माज दाखवणारे ,
हे ते आहेत ज्यांना काही लोकांनी नाही दिली इज्जत 
केल होत नजर अंदाज, 
हे तेच आहेत जे कित्येक महिने झाले नाही गेले घरी 
साथ देऊ आपण त्यांना , राहुन आपल्या घरी.

गर्व वाटतो आम्हाला तुमच्यावर 
सलाम आहे तुमच्या या कामावर.

                          -✍️मिथिलेश संजय गायकवाड 

Sunday, April 25, 2021

मी निघालो शोधण्यास स्वतः ला कोण आहे मी कळेल का मला ...

मी निघालो शोधण्यास स्वतः ला 
कोण आहे मी कळेल का मला...

मी या जगात आलोय कशासाठी 
सापडेल का ते  मला,
हजारो लोकांमध्ये स्वतः च वेगळेपण 
सिद्ध करता येईल का मला..?

 मनात अनेक प्रश्न आहेत 
त्यांची उत्तरे मला सापडणार का,
आयुष्य जगण्याचा नवा अर्थ 
मला समजणार का ..?

मार्ग अनेक आहेत पण 
जगण्याचा मार्ग सापडेल का मला,
स्वप्नांच्या समुद्रात खोलवर उडी घेतली 
तर पोहता येईल का मला ...?

दिवस आणि रात्र दोघेही एकत्र 
येऊन प्रकाश द्यायला येतील का मला,
अशक्य हे शक्य करून 
मी हि शोधणार आहेच स्वतःला .
                           
                        - ✍️मिथिलेश गायकवाड.

Wednesday, April 21, 2021

फौजी होणं माझ्या रक्तातच आहे...

फौजी होणं माझ्या रक्तातच आहे 
ह्रदयातुन तर मी एक फौजीच आहे ,

कष्ट तर खूप करत आहे 
फक्त शरीर साथ देत नाही 
पण ह्रदयातुन तर मी एक फौजीच आहे..

जिंकने आणि हरणे सगळ्यांचाच आयुष्यात आहे 
पण फौजींना हरण माहीतच नसतं 
मुळात हरणं त्यांच्या रक्तातच नसतं 
त्यांना फक्त जिंकन माहित असतं ....

फौजी होणं माझ्या रक्तातच आहे
ह्रदयातुन तर मी एक फौजीच आहे...
फक्त अंगावर वर्दीची कमी आहे 
तिला कष्ट करून मला कमवायचीच आहे... 
कदाचित तेव्हा माझी ओळख एक फौजी म्हणून होइल..
कदाचित तेव्हा माझी ओळख एक फौजी म्हणून होइल.

ह्रदयातुन तर मी एक फौजीच आहे....

                        - ✍️मिथिलेश गायकवाड 

शिवाजी कोण होता?’ - एक विचारप्रवर्तक पुस्तक

शिवाजी कोण होता ?  या पुस्तकाची पहीली आवृत्ती एप्रिल १९८८ मध्ये ३००० प्रतीची निघाली होती आणि इतक्या उशिरा हे पुस्तक मी वाचलं यां...